Tuesday, February 21, 2012

असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. आपण जसं पाहतो, जे पाहतो त्यात आपल्या मनाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. आपलं आनंदी असणं, दुःखी असणं हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात प्रतिबिंबित होत असतं. तर कधीकधी आजूबाजूच्या वातावरणाने आपला मन प्रसन्न होतं. आपला मूड आणि आजूबाजूचं वातावरण याच्यापैकी कुणाचा कुणावर जास्त प्रभाव पडतो, हे अधोरेखित करणं खरोखर अवघड आहे. किंबहुना यातली सीमारेषा अतिशय धूसर आहे.


काही लोकाना प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोच काढायची सवय असते, तर काहीना अगदी वाईटातूनही चांगला काहीतरी शोधता येतं. अशा लोकांच्या संपर्कात येणारी व्यक्तीही आपोआप प्रसन्न होऊन जाते.


ज्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे अशी माणसं जगात आहेतच. पण प्रत्येक माणसाचं व्यक्त होणं ते खूप वेगवेगळं असतं. काहींना सहज सोप्या भाषेत म्हणणं मांडण्याची कला अवगत असते, तर काहींना अतिशय जड शब्द, अवघड शब्द नेमकेपणाने वापरता येतात. ( ग्रेसांची कविता हे याचं उत्तम उदाहरण आहे.. माझ्यासारख्या व्यक्तीला अनेकदा वाचून त्यातलं अवाक्षरही झेपत नाही ही गोष्ट वेगळी! मी आपली लोक म्हणतात ते खरच ग्रेट आहेत तर बुवा आहेत या चालीवर म्हणतेय!)
साधी सोपी मांडणी मात्र मनाला लगेच भावून जाते. व. पु. कुठे तरी म्हणून गेले आहेत, की लिखाण कसं असावं; तर जे वाचल्यावर, अरेच्चा! हे आपल्याला का नाही सुचलं बुवा, असं वाटायला लावणारं कुठलंही लिखाण.

आणि अशा सहज शब्दात जर आपल्या आयुष्याचा महोत्सव जर कुणी मांडून ठेवला, तर??


प्रति एक झाडा, माडा त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पाना, फुला त्याचा त्याचा तोंडावळा

असो पाखरू, मासोळी, जीव, जीवार, मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव काही आगळीवेगळी

असो ढग, असो नग, त्याची अद्रुत रेखणी
जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी

उठे फुटे जी जी लाट तिचा अपूर्वच थाट
फुटे मिटे जी जी वाट तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे! अपुली चाले यातूनच यात्रा   


आपल्या आजूबाजूचं विश्व सहज शब्दात मांडणारे शब्द! कवी बा भ बोरकर यांनी लिहिलेली ही एक कविता. कुठली व्यक्ती जगाकडे कशी बघत असेल बरं असा प्रश्न पडता पडताच असं काही वाचण्यात येतं.
वाचल्यानंतर आपोआपच हा सोहळा आपणही अनुभवू लागतो.

Hats off to Borkar!!
(Thanks AM for sharing this :-))

Wednesday, February 8, 2012

किंमत

नवीन वर्षातला एक महिना बघता बघता उलटून गेला. दुसऱ्या महिन्याचा दुसरा आठवडाही सुरु झाला.
म्हटलं तर बराच काळ म्हटलं तर एक-दीड तर महिना. काळाची गती इतकी तुफान आहे की जणूकाही पापण्या लवायच्या आत दुनिया प्रचंड बदलेल इतकी प्रचंड गती जाणवते कधीकधी. होत्याचं नव्हतं व्हायला तसं म्हटलं तर एक क्षणही पुरेसा असतो. मग एक आठवडा काय चीज आहे!



माणसं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. आपल्या आजूबाजूला असतातच सदैव. त्यात काय? पण त्याचं महत्त्व, त्यांच्या अस्तित्वाचा तुमच्या आयुष्याशी जोडलेला धागा कुठलीतरी परिस्थिती आल्यावर प्रखरपणे जाणवून देण्याची सोय निसर्ग आपोआपच करीत असतो. तुमच्या ध्यानीमनी नसताना तुमच्यावर सदैव कुणावरतरी विसंबून राहण्याची वेळ येते. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यासाठी चोवीस तास कुठल्या न कुठल्या प्रकारे त्यांची स्वतःची कामे बाजूला सारून धावत पळत असतात.  तेही विनातक्रार. चेहऱ्यावरती कसलाही थकवा जाणवू न देता. घरापासून आपण हजार किलोमीटर लांब असलो तरीही निश्चिंत आहोत. ही भावना केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे मनात असते. रक्ताची नाती तर असतातच, पण मनाची नाती बांधली गेली तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असलो तरी एकटे नाहीयोत ही भावना खूप सुखावून जाते.

गेल्या महिन्यातलं माझं आजारपण या सगळ्या लोकांची किंमत मला शिकवून गेलं.  या सगळ्यांसाठी धन्यवाद हा शब्द खूप वरवरचा, त्रोटक आणि कोरडा वाटतो. 'Thank you' हा शब्द आजकाल इतक्या सर्रासपणे रोजच्या वापरत असतो की आताशा त्यातला खरा रस निघून गेल्यासारखाच वाटतोय. असो. इतकंच म्हणेन की सगळ्यांनी माझ्यासाठी जे केलं त्याचा विसर मला कधीच न पडो.




आपण आपल्या शरीराला तसं नेहमीच गृहीत धरत असतो. कधी कल्पना नाही करवत की एखादा अवयव जर निकामी झाला तर किती अडचणींचा सामना करावा लागेल. इतकं कशाला, साध्या आपल्या हाताच्या एका म्हटलं तर क्षुल्लक, अशा शिरेने जर असहकार पुकारला तर किती वाट लागू शकते याचाही प्रत्यय मला नुकताच आला. सलाईन दिल्यानंतर जेव्हा ती शीर सुजली आणि हात हलवताना नाकी नऊ येऊ लागले तेव्हा जो झटका बसला तो बसला.किंमत कळते ती अशीही.



आपण बऱ्याचदा इतक्या वेगळ्या विश्वात वावरत असतो की मृत्यू हे अंतिम सत्य आहे वगैरे वगैरे तत्वज्ञान खरं आहे हेच विसरायला होतं. जाणवतही नाही की आज आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय, हसतोय, गप्पा मारतोय तो कदाचित् काही दिवसांतच या जगातून जाणार आहे. जाणवेल तरी का? आणि कशाला? पण तरीही चुटपुट लागून राहते. बातमी ऐकल्यावर विश्वास बसत नाही. हीच का ती व्यक्ती? गेल्याच तर रविवारी
आपण भेटलेलो. गप्पा मारल्या. कितीतरी गोष्टी ठरवल्या. आणि आज ऐकतोय की ती या जगातून गेली! अचानकच! संपले म्हणे तिचे या जगात घ्यायचे श्वास. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्माला येतानाच हे ठरलेल असतं. काहीही. पण वाट्टेल तेव्हढा त्रागा करा, चीडचीड करा, रागराग करा.. शेवटी आपल्या हातात काहीच नाही. भांडायचं तरी कुणाशी? देव अस्तित्त्वात आहे का नक्की ? जाऊन भांडता तरी येइल! ही काय पद्धत आहे का माणसाला उचलायची? जाऊ देत. आपण जाऊच द्यायचं. आणखी करणार तरी काय म्हणा.
व्यक्ती गेली की मग एक एक गोष्ट आठवत राहते. अरेच्चा हे तर सांगायचच राहून गेलं, पुन्हा एकदा मुदुमलाईला बोलवायचं राहून गेलं. कसले प्लान्स आणि काय.
LIFE IS SOMETHING THAT HAPPENS TO YOU WHILE YOU ARE BUSY MAKING OTHER PLANS. हेच खरं.
असेही झटके मिळतात. किंमत कळते ती अशीसुद्धा!




नवीन नाती सतत जोडली जात राहतात. आपण खुशीत असतो की वाह, क्या बात है! आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याबरोबर आपली इतकी माणसं आहेत. भाग्यवान असतो आपण हे नक्की. पण ते भाग्य कदाचित आधीच्या माणसांच्या दुरावण्याशी जोडलेलं असतं कदाचित.


Sunday, January 8, 2012

Life… or something like that!

Is your life heading the correct way you wanted it to? Are you sure about the correctness of whatever decisions you made at any point of time?
 -But how do you even decide before actually trying out?  What are the odds of other choice of leading life/career or whatever being correct? Wouldn’t you have felt the same what you are feeling right now? What is the guarantee?  Should you not rather be happy about the path you chose/ decisions you made were on your own and nobody else decided them for you?  Then why do you even hesitate to accept the consequences of those?  Why do you feel low when somebody points out only negative consequences of them and easily forgets to look at positive stuff (however little) you were gifted along with them?     
Why other people always seem to have surpassed you in any sense-be it career or money or may be something else (whining about you deserving far better opportunities/quality life/ quality job etc. etc. than a buddy who is supposedly getting it all)?
-How can you even compare? If you want to compare, have you made sure that other conditions are at same level? Who says that you deserve better that THE person you are comparing with? That person could have some other qualities which you might not have. Or it could be just the circumstances/ situation.  And how do you know that other people who seem to have got everything better are happy and satisfied with the decisions they made in their life? There is a possibility that they might be regretting upon not getting something else!

List of questions seems to be endless. Worst part is; there are no simple/right/exact answers to them all. Only statement you can make is- IT DEPENDS, on how you look at them. Rather if you don’t spend time thinking about it, life becomes easier.
.
.
.
.
You meet someone who is facing all these questions right now. You try convincing that person that how he/she should go about it. You give advices about how not worrying about it will help. You suggest believing what is happening is good and meant to be happening that way. Life is not that bad or miserable and there are several other wonderful aspects in his/her share of life. 

AND YOU FEEL YOU ARE TRYING TO CONVINCE YOURSELF RATHER THAN CONVINCING SOMEONE ELSE!!

Thursday, November 17, 2011


रविंद्रनाथ टागोर. या माणसाबद्दल बऱ्याच लोकांकडून बरंच काही ऐकलं होतं. या माणसाला, याच्या साहित्याला, लोक इतकं का मानतात, हे आतापर्यंत कधी कळलं नव्हतं. किंबहुना कळून घ्यावं अशी मनापासून कधी इच्छा झाली नव्हती. बंगाली साहित्य आणि रविन्द्रनाथ टागोर यांची नावं जोडीनंच घेतली जातात. इतरही अर्थातच कितीतरी साहित्यिक असतीलच; परंतु रविन्द्रनाथांना जे प्रेम, जो नावलौकिक लाभला तितका इतर कुणाला क्वचितच लाभला असेल.(आणि असल्यास केवळ माझ्या अज्ञानातून आलेलं वरील स्वगत आहे असं समजून घेण्यास हरकत नसावी).
पु. ल. देशपांडे हे मराठी साहित्यातलं अग्रगण्य नाव. बंगाली भाषा शिकण्यासाठी आणि नंतर रवीन्द्रनाथांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी ते खास बंगालला जाऊन राहिले होते हे ऐकल्यावर त्यांच्याविषयी वाटणारा आदर आणखी वाढला होता. त्यांच्या शान्तिनिकेतनाताल्या मुक्कामाताल्या अनुभवांवर आधारलेलं ‘मुक्काम शांतीनिकेतन’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वी हातात पडलं. या पुस्तकात मुख्यतः पु लं च्या नजरेतून रविंद्रनाथ जाणवत राहतात. रवीन्द्रनाथांच्या साहित्यातले स्फुट उतारे, त्यांच्या कविता, काही पत्रे यांचा अनुवाद पु लं नी केलाय. अनुवादावर पु लं ची छाप जरी असली तरी रविंद्रनाथ या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे कंगोरे दिसत राहतात. विशेषतः निसर्गाशी जवळीक साधून राहिलेले ते निसर्गाविषयी आपलेपणा दाखवताना जगावं कसं; याबद्दल जाता जाता अत्यंत सोप्या भाषेत खूप काही शिकवून जात आहेत असं सतत जाणवत राहतं. एका वेगळ्याच दृष्टीकोनातून मग आपण आपल्या आयुष्याकडे पहायला लागतो. 

नाथांच्याच भाषेत सांगायचं तर:
...कोण मला काय बोललं, कोण मला काय समजलं, हे काय जगात सर्वांहून अधिक मोठं? माझ्या डोळ्यातली क्षणभराची दृष्टीशक्ती ही किती प्रचंड गोष्ट आहे! एक वेळ नुसता श्वासोच्छवास घेण्याची माझी शक्ती ही केव्हढी आश्चर्यकारक घटना! माझ्या मते, ह्या परम आश्चर्यकारक वस्तुस्थितीला कुठलंही दुःख मलीन करू शकणार नाही.
.. वाटतं जीवनातल्या प्रत्येक सूर्योदयाला ओळखीच्या नात्याने नमस्कार करायला हवा आणि प्रत्येक सूर्यास्ताला जिवलग मित्रासारखा निरोप द्यायला हवा. इतक्या सुंदर रात्री माझ्या जीवनातून रोज निघून चालल्या आहेत.-ह्या सगळ्या काही मी धरून ठेवू शकत नाही. हे सारे रंग, हा प्रकाश, ह्या छाया हा आकाशव्यापी निःशब्द महोत्सव, ही ध्युलोक आणि भूलोकाच्या मध्ये असलेली, सारं शून्य परिपूर्ण करणारी शांती आणि सौंदर्य ह्यांसाठी काय कमी पूर्वतयारी(आयोजन) चालली असेल? उत्सवाचं क्षेत्र केव्हढ विशाल? बाहेर एव्हढं आश्चर्यकांड चाललय आणि आमच्या आत मात्र ती हाक ऐकूही जाऊ नये. जगापासून इतकी फारकत घेऊन आम्ही जगतो आहो?  लक्ष लक्ष योजनांच्या अंतरावरून लक्ष लक्ष वर्षांपूर्वी अनंत अंधकाराच्या वाटेनं प्रवास करत एखाद्या तारकेचा प्रकाश ह्या पृथ्वीवर येऊन पोहोचतो आणि आमच्या अंतरात येऊन तो प्रवेश करू शकत नाही- जणू काय तो आणखीही लक्ष योजनं दूर! 


अस काही वाचलं की जाणवतं; की आपली दुःख, आपल्या समस्या आपण किती कवटाळून बसतो!  मी, माझं हे, माझं ते, मला यानं दुखावलं, इत्यादी इत्यादी अत्यंत छोट्या गोष्टीमध्ये गुरफटून जाताना आपण हे विसरूनच जातो की यापलीकडेही जग आहे. चार भिंतीत बंदिस्त किती सहजतेन करून घेतो स्वतःला आपण!


काल सहज रात्री आकाशाकडे नजर गेली आणि खरंच जाणवलं की हे लक्ष तारे लक्षावधी योजनांचा प्रवास करून आपल्याला भेटायला आले आहेत. तसे ते रोजच येतात; हसतमुखानं त्यांच स्वागत करायचं मात्र राहून जातं..


Tuesday, October 11, 2011

रंगीत तालीम

पत्त्यांचा बंगला..  लहानपणीचा हा एक आवडीचा उद्योग. एकाशेजारी एक त्रिकोणी आकारात पत्ते उभे करायचे. त्यावर अलगद एक एक पत्ता आडवा ठेऊन त्यावर पुन्हा एकदा एक आख्खा मनोरा रचायचा. त्यावर आणखी एक.. त्यावर आणखी एक..हळूच दाराच्या फटीतून.. कधी खिडकीतून येणारी चुकार झुळूक तो कष्टाने उभारलेला मनोरा जमीनदोस्त करायची; तर कधी आपलाच धक्का लागून त्याची धूळधाण व्हायची. हिरमुसलेल मन पुन्हा एकदा ताज्या दमाने बंगला बांधायला निघायचं. न थकता.



आजकाल पत्त्यांचे बंगले नाही बांधले जात.. बांधले जातात ते स्वप्नांचे.. भाबड्या आशेने रचत जातो एकावर एक स्वप्नाचे मनोरे.. कधीतरी कुठलातरी परिस्थितीचा फटका बसतो, आणि त्या स्वप्नाचा मनोरा ढळतो ..कधी पूर्णच कोसळतो तर कधी अर्धवट.
तरीही आपण हरत नाही .. नव्या जिद्दीने, नव्या उत्साहाने तयार होतो.. सिद्ध होतो पुन्हा एकदा ताज्या दमाने नवीन मनोरे बांधायला.. वेगळ्या तऱ्हेची, वेगळी पानं घेऊन..





लहानपणचे  असे खेळ हे पुढच्या आयुष्याला तोंड देण्यासाठीच्या रंगीत तालमीच असाव्यात..

Sunday, September 18, 2011

The Number Sense

Following is a chapter from a book named 'NUMBER: The Language of Science' by Tobias Dantzig - a  Baltic-German Russian-american mathematician ( thanks to wikipedia!).

Initially I was thinking to write a short essay which will describe the essence of this interesting article. But the flawless language and the art of explanation of author forced to change my mind. Better to share the original!

Here it is..

Friday, August 19, 2011

कोलाज

तो निळाशार..
आकाशाचा आरसा
आकाश आपली निळाई न्याहाळत हसत असलेलं जणू

तो अथांग..अपार..
दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत पसरलेला..किंबहुना त्याच्याही पलीकडे
मर्यादा तर होत्या माझ्याच नजरेला

समोरचं क्षितीज..
आकाश आणि धरणीला विलग करणारं एक धूसर सत्य
अन्‌ तेच क्षितीज..
जणू एक मृगजळ
मी एक पाऊल पुढे टाकलं की तेही टाकी एक हळूच मागे
त्याला कवेत घेण्याचं माझं स्वप्न शेवटी अपुरंच

तो किनारा..
चहूबाजूंनी पाण्याने वेढले जाण्याची उगा दाटलेली अनामिक भीती
फोल असल्याची जाणीव करुन देणारा
मला माझ्या परिचित जगाशी-जमिनीशी जोडून ठेवणारा दुवा

तो धीरगंभीर..
त्याच्या ह्र्दयातून उत्पन्न होणार्‍या लाटा मात्र अवखळ..चंचल
हसत हसत किनार्‍याकडे धाव घेणार्‍या
जितक्या आतुर सामावून जाण्यास
तितक्याच सामावून घेण्यासही..
किनार्‍यावरच्या वाळूशी त्यांचा चाललेला पाठशिवणीचा खेळ
माझ्या पावलांना स्पर्श-सुखावून जात होता

मी किनार्‍यावर..तो समोर..
वरवर भासत होता शांत..स्थिरचित्त
कोट्यावधी जीवांचं घर त्याच्यामधे दडलंय
माझ्या जाणीवेपलिकडचं एक प्रचंड विश्व त्याच्या पोटात नांदतय
लाटांसमवेत किनार्‍यावर येउन पहुडणारे शंख-शिंपले, खेकडे
त्यांच्या अस्तित्त्वाची झलक दाखवून देत होते

दिवस हळूहळू कलू लागला
पौर्णिमेच्या दिवशी जरा लाटांना उत्साहाचं उधाणंच येतं जणू
सुरुवातीची त्याची गाज मंद आवाजात मंत्रपठण केल्यासारखी
त्याचं केव्हा उच्च नामघोषाच्या लयीत-सुरात रुपांतर झालं ते समजलंही नाही

मी हलकेच माझे डोळे मिटून घेतले
बाहेरचा कोलाहल शांत झाला
बाहेरच्या जगापेक्षा वेगळं असं आणखी एक विश्व खुणावू लागलं
ऐकू येऊ लागला एक वेगळा नाद..अंतर्नाद
माझ्या मनातही एक अखंड दर्या सामावलेला आहे...!






Monday, July 18, 2011

नक़ाब


कितने सारे नक़ाब पहन रखे है मैने
चाहा की फ़ेंक दूं सब उतारके कहीं तो

जब करने लगी ऐसा तो जाना
एक एक नक़ाब मेरा एक एक रुप था
कितने सारे चेहरे लेकर घूमती हूं मै
हर एक का अपना अपना रंग था

उन सारे नक़ाबों के तले छुपा
आखिर वह एक सामने आया,
भूला-सा, बिसरा-सा था वह
खुद से कई तरह से अलग पाया

वो जो कभी मेरी पहचान हुआ करता था
आज मेरे लिये अजनबी बन गया है
या फिर किसी नये रंग-रूप के खातीर
मैने ही किसी और हस्ती से रिश्ता सजाया है

.
.
.
.
.
.
चढा दिये फिर सारे एक एक कर के
अब इसी चेहरे की आदत सी हो गयी है।