Friday, August 19, 2011

कोलाज

तो निळाशार..
आकाशाचा आरसा
आकाश आपली निळाई न्याहाळत हसत असलेलं जणू

तो अथांग..अपार..
दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत पसरलेला..किंबहुना त्याच्याही पलीकडे
मर्यादा तर होत्या माझ्याच नजरेला

समोरचं क्षितीज..
आकाश आणि धरणीला विलग करणारं एक धूसर सत्य
अन्‌ तेच क्षितीज..
जणू एक मृगजळ
मी एक पाऊल पुढे टाकलं की तेही टाकी एक हळूच मागे
त्याला कवेत घेण्याचं माझं स्वप्न शेवटी अपुरंच

तो किनारा..
चहूबाजूंनी पाण्याने वेढले जाण्याची उगा दाटलेली अनामिक भीती
फोल असल्याची जाणीव करुन देणारा
मला माझ्या परिचित जगाशी-जमिनीशी जोडून ठेवणारा दुवा

तो धीरगंभीर..
त्याच्या ह्र्दयातून उत्पन्न होणार्‍या लाटा मात्र अवखळ..चंचल
हसत हसत किनार्‍याकडे धाव घेणार्‍या
जितक्या आतुर सामावून जाण्यास
तितक्याच सामावून घेण्यासही..
किनार्‍यावरच्या वाळूशी त्यांचा चाललेला पाठशिवणीचा खेळ
माझ्या पावलांना स्पर्श-सुखावून जात होता

मी किनार्‍यावर..तो समोर..
वरवर भासत होता शांत..स्थिरचित्त
कोट्यावधी जीवांचं घर त्याच्यामधे दडलंय
माझ्या जाणीवेपलिकडचं एक प्रचंड विश्व त्याच्या पोटात नांदतय
लाटांसमवेत किनार्‍यावर येउन पहुडणारे शंख-शिंपले, खेकडे
त्यांच्या अस्तित्त्वाची झलक दाखवून देत होते

दिवस हळूहळू कलू लागला
पौर्णिमेच्या दिवशी जरा लाटांना उत्साहाचं उधाणंच येतं जणू
सुरुवातीची त्याची गाज मंद आवाजात मंत्रपठण केल्यासारखी
त्याचं केव्हा उच्च नामघोषाच्या लयीत-सुरात रुपांतर झालं ते समजलंही नाही

मी हलकेच माझे डोळे मिटून घेतले
बाहेरचा कोलाहल शांत झाला
बाहेरच्या जगापेक्षा वेगळं असं आणखी एक विश्व खुणावू लागलं
ऐकू येऊ लागला एक वेगळा नाद..अंतर्नाद
माझ्या मनातही एक अखंड दर्या सामावलेला आहे...!






Monday, July 18, 2011

नक़ाब


कितने सारे नक़ाब पहन रखे है मैने
चाहा की फ़ेंक दूं सब उतारके कहीं तो

जब करने लगी ऐसा तो जाना
एक एक नक़ाब मेरा एक एक रुप था
कितने सारे चेहरे लेकर घूमती हूं मै
हर एक का अपना अपना रंग था

उन सारे नक़ाबों के तले छुपा
आखिर वह एक सामने आया,
भूला-सा, बिसरा-सा था वह
खुद से कई तरह से अलग पाया

वो जो कभी मेरी पहचान हुआ करता था
आज मेरे लिये अजनबी बन गया है
या फिर किसी नये रंग-रूप के खातीर
मैने ही किसी और हस्ती से रिश्ता सजाया है

.
.
.
.
.
.
चढा दिये फिर सारे एक एक कर के
अब इसी चेहरे की आदत सी हो गयी है।

Monday, May 9, 2011

खेळ मांडियेला..


कधी कधी अतिशय अनपेक्षित प्रसंग घडतात. बरे-वाईट कसेही असोत, काही मनःपटलावर कोरले जातात. सुतराम म्हणतात, तसादेखील संबंध नसताना आपण एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे साक्षीदार होतो. नशीब - दैव अश गोष्टी सत्य आहेत की नाहीत असे प्रश्न अशा वेळी विचारता उपयोगाचे नसतात. जर त्या अनुभवावर आपलं नाव कोरलेलं असेल तर फक्त आणि फक्त साक्षीभावाने येणार्‍या प्रसंगाला सामोरं जाणं इतकंच आपल्या हातात उरतं.
लहानपणी खेळल्या जाणार्‍या अनेक खेळांपैकी चोर-पोलीस हा एक खेळ. चोर होणं कोणाला मान्य असतं बरं? प्रत्येकाला पोलीसंच व्हायचं असतं. मीही त्यला अपवाद नाही. प्रत्यक्षात मात्र किती अवघड आणि जबाबदारीचं काम आहे हे! एखादी संशयित व्यक्ती खरी की खोटी? कसं ठरवायचं? कुठली कसोटी लावायची? जितकं एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधावं तितकं प्रश्नांच्या गर्तेत अधिकाधिक खोल गेल्यासारखं वाटतं.

हजार प्रश्न. त्याची हजार उत्तरं. काय सत्य? काय असत्य? एक खोटं दुसर्‍या खोट्याला जन्म देतं असं म्हणतात. मूळ खोट्याशी (किंबहुना खर्‍या उत्तराशी) पोहोचावं कसं? बरं ते खरं नाही- खोटंच- हे कशावरून? आपण आपल्या बुद्धीच्या, तर्काच्या मर्यादेच्या बाहेर नाही जाउन विचार करू शकत. आपल्या जाणीवा आपल्याला आलेल्या अनुभवांनी समृद्ध होत असतात. त्यावरुन आपण बाकीचं जग पडताळत, आजमावत असतो. ’पाच आंधळे आणि हत्ती’ ची गोष्ट नाही का? प्रत्येकाला समजलेला हत्ती वेगळाच.
आयुष्याची वेगळी अशी - dark side - ही असू शकते, जिचा अंदाज आपल्याला नसू शकतो. आपल्या चष्म्यातून जग न्याहाळताना याचा विसर आपल्याला पडू शकत नाही का?

एक माणूस. त्याचा संशयास्पद वावर त्याला पोलिसांच्या नजरेत भरवतो. त्यातून निर्माण झालेली चौकशीची गरज. यात अर्थाअर्थी माझा तसा काहीच संबंध नाही. पण निमित्त हे, की संशयित व्यक्ती हिंदी बोलणारी आणि पोलिसाला हिंदीचा गंध नाही. त्यामुळे माझं काम दुभाषीचं. प्रश्नोत्तराची प्रक्रिया माझ्याद्वारे चालू. ही प्रकिया इतकी वेदनामय, की नसती आपल्याला ही भाषा समजत तर बरं झालं असतं असा विचार माझ्या मनात एकदम चमकून गेला. संशय एकदा निर्माण झाला की तो अधिकाधिक बळावतच जातो. तसंच काहीसं यावेळीही झालं. प्रश्नोत्तरागणिक संशय वाढत होता. खरं बोलत असला तरी समजणार कसं? त्यासाठी पर्याय, साधन काहीच नाही. सर्व दरवाजे जवळपास बंद. चौकशी संपली खरी. डोक्यातले विचार मात्र संपले नाहीत. ते थैमान घालतच होते.

’तो’ नक्की कोण? खरा की खोटा? का त्याच्यावर अशी वेळ यावी? नियतीच्या मनात काय आहे नक्की?

काहीही असो. सत्य लवकर सामोरं यावं. सत्याचाच विजय व्हावा अशी अपेक्षा करण्याउपर आपण काहीच करु शकत नाही.

’तो’ कायमचा लक्षात राहील ही गोष्ट मात्र पक्की.
माझ्या लिस्ट मधे उग्गाच आता आणखी एकाची भर पडली आहे.

Friday, February 25, 2011

And it happened again.. after a loooooooong time.. but IT HAPPENED!!

A unique experience...
 
Learning.
A joy of creating; constructing something new.

Doing things which were not too obvious before.
Visualizing facts which were abstract in their own way.


A merry heart..jumping; exactly like a small kid jumps with joy when it watches his kite flying all way up in the sky...

Friday, February 4, 2011

सहप्रवासी

 त्या दोघी, बेंगलोर-पुणे प्रवासात भेटलेल्या. अनपेक्षितपणे लांबलेल्या प्रवासात झालेली मैत्री.. की नुसतीच ओळख??...काहीही असो. सुरुवातीच्या काही तासांमधला तो अलिप्तपणा कधी विरघळून गेला कळलंही नाही. त्यातल्या त्यात ती एक जास्तच बोलकी. तितकीच निरागस. परीक्षा संपल्या संपल्या घरच्या ओढीनं मिळेल त्या गाडीनं जायचं म्हणून त्या गाडीत चढलेल्या. नेमका काही अपरिहार्य कारणांमुळे गाडीला उशीर. सुरुवातीच्या गप्पा अगदी जुजबी. ’ती’ चा ’तो’ ही त्याच गाडीत दुसर्‍या एका डब्यात. त्या दोघी आणि तो.. एक त्रिकोण. ’ती’ दुःखी. माझ्यासारख्या तिर्‍हाईतापाशी ’ती’ नं तिचं मन मोकळं केलं. ’दीदी, तुम ही बताओ मै क्या करूं??’ वर सल्ल्याचीही अपेक्षा. मी काय सल्ला देणार? कपाळ??? शेवटी कसंबसं चारदोन गोष्टी सांगून शांत केलं. प्रवास संपताना माझी पावलं माझ्याच नकळत जड झाल्याचं जाणवलं. ’ती’ने दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधायचा प्रयत्नही केला. संपर्क होऊ शकला नाही.


त्या आजी, त्याच प्रवासात भेटलेल्या. मुलीच्या घरी चाललेल्या. गाडी लेट आहे हे मुलीला माझ्या फोन वरून कळवलं. मुलगी काळजीत. सतत काही वेळाने संपर्क करत होती. व्यवस्थित सुखरूपपणे घरी पोहोचल्यावर पुन्हा त्यानी मला फोन केला. आभार मानण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी..


ते काका, रेल्वेत आम्ही संगणक वापरत असलेला पाहून लगेच त्यानी जुन्या गाण्यांची फर्माईश केलेली. मस्तपैकी गाणी ऐकत झालेला तो लांबलचक प्रवास कधी संपला ते कळलंही नाही.


ती, स्वारगेट-कर्वेनगर या संध्याकाळच्या वेळी रहदारीमुळे तास-सव्वा तास खाणार्‍या प्रवासात भेटलेली. ती च्या मांडीवर एक दोन-एक वर्षाची मुलगी. ’ती’ चांगली एल. एल. बी झालेली. एल. एल. एम ची तयारी करत होती. अगदी संसार संभाळून. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय प्रेमविवाह. सुरुवातीला सगळे आलबेल. लग्नानंतर मात्र घरच्या बाईने घरची जबाबदारी संभाळावी, माणसांचे हवे-नको ते बघावे असा सूर. माहेरचा आधार तुटलेला. त्यामुळे कात्रीत सापडलेली. त्या तासाभराच्या प्रवासात ’ती’ ने तिची व्यथा माझ्यासमोर मांडली. सांत्वन करण्यापलिकडची अवस्था. माझा थांबा आल्यावर मी उतरले.. ’ती’ मात्र तशीच मनामध्ये घोटाळत राहिली.


’ती’, माझी सख्खी मैत्रीण. तब्बल पाच वर्षे आम्ही एकाच बेंचवर बसायचो. शाळा संपल्यावर वाटा वेगळ्या झाल्या. सुरुवातीला असणारा सम्पर्क हळूहळू कमी होत बंद पडला. अचानक कधी तरी कुणाकडून तिच्या बद्दल समजलं. थोडं वाईटच वाटलं. अजूनही असं वाटतं अचानक ती समोर येउन उभी राहील..’काय ओळखलं का?’ असं विचारेल..आणि मी डोळ्यातलं पाणी हलकेच पुसून हसून म्हणेन.. ’गधडे, कुठे होतीस इतके दिवस??’





आपल्याला सतत वेगवेगळी माणसं भेटत असतात. निमित्त काहीही असो. काहींशी पटकन मैत्र जुळतं. काहींच्या बाबतीत कटू आठवणीही. थोड्या काळासाठी आपल्या आयुष्यात आलेली अशी माणसं. सहप्रवास काही क्षणांपासून काही वर्षांपर्यंतचाही... अचानकपणे अशाच आठवणी येतात.. मनात तरंग उमटवून जातात. काय करत असतील ही सगळीजणं आत्ता? कशी असतील? यापैकी किती जणांनी मला लक्षात ठेवलं असेल? किती जण माझी आठवण काढत असतील? असतीलही कदाचित.

कधी अनपेक्षितपणे त्यांची भेट झाली तर...

Tuesday, January 4, 2011

पुराण

आज टीव्ही वर एक पौराणिक मालिका बघायचा योग आला. मारनचा असल्या सगळ्या मालिकांवर फार जीव आहे. या मालिका तो रोज न चुकता बघतो. त्यामुळे आज मलाही अर्धा तास ती मालिका ’सहन’ करावी लगली. ’सहन’ अशासाठी की, पौराणिक मालिका बघण्यास हरकत नही पण तमिळ मधे चालू असलेली किती वेळ सहन करणार?? अर्थात असल्या मालिका कळायला भाषा यायलाच हवी हे काही बंधनकारक नाही.

बर्‍याच वर्षांपूर्वी ॐ नम: शिवाय, श्रीकृष्ण, विष्णू पुराण आदी खूप मन लावून नियमितपणे मीही बघितल्या आहेतच. आज मात्र त्यावेळी ज्या भक्तीभावाने बघितल्या होत्या त्या भक्तीचा, किंवा निरागस विश्वासाचा कुठेही मागमूसही शिल्लक राहिला नाहीय अस प्रकर्षाने जाणवलं. कारणमीमांसा करायचीच झाली तर -- १) जास्त शिकल्यामुळे शिंग फुटली आहेत, बाकी काही नाही. २) आजकालच्या पिढीचं काय करावं हेच समजत नाही हो.. सगळे असलेच.. जरा रोज देवासमोर हात जोडून शांत बसा म्हटलं तर ऐकायची सोय नाही. देवाची सुद्धा खिल्ली उडवायला कमी करत नाहीत ही आजकालची पोरं...  इत्यादी इत्यादी विधानांपैकी कुठलही एक चिकटवून टाका बिनधास्त!

पण खरंच, अशा मालिकांतून जे चित्र उभं करतात त्यातून इतके भयंकर प्रश्न पडतात की बस्स.

  • या सगळ्या देवांना (अन दानवांना सुध्दा) रात्रंदिवस तो भरजरी पोषाख आणि दागिने घालणं बंधनकारक असतं का? सगळेजणं आपले सदैव कुठल्यातरी लग्नकार्याला निघाल्यासारखे नटलेले. बरं तरं बरं, बायकांची अवस्था म्हणजे आणखी वाईट. असल्या make up मधे रडायला पण लावतात. पण आज तर height च झाली. वामनाचा जन्म झाल्या झाल्या दुसर्‍या मिनिटाला त्याची आई मस्त टकाटक! (पूर्ण make up मधे with all accessories.. I mean jewellery and all...)  अर्थात हा त्या मालिकेच्या दिग्दर्शकाचा प्रश्न आहे म्हणा. देव जर खरच अस्तित्वात असेल तर त्यालाही असले प्रश्न नक्कीच पडत असणार.. अगदी शंभर टक्के!
  • या सगळ्या देवांच्या आणि दानवांच्या hairstyle आणि कपड्यांमधे प्रचंड फरक. देवांचे (आणि देव्यांचे :-)) पोषाख सगळे पांढरे, bright आणि fresh रंगांचे. आणि दानवांचे मुख्यतः काळपट आणि गडद. हा significant difference खरच असेल का हो? हा दानवांवरती अन्यायच नाही का?
  • हे सगळे ऋषी मुनी म्हणा, देव म्हणा, चौकात भाजीला चालल्यासारखे ’काही नाही, जरा स्वर्गात जाउन येतो’ अस सहज म्हणून गेल्यासारखे सगळीकडे हिंडत असतात. चहाला कैलासावर तर नाश्त्याला वैकुंठात. मजाच असते!
  • काही देव/ऋषी either मृगजिनावर किंवा वाघाच्या/ बिबट्याच्या कातडीवर बसलेले असतात म्हणा किंवा त्यापासून बनवलेले वस्त्र परिधान करत असतात. आजकालच्या युगात ते जर असते तर मनेका गांधीनी नक्कीच case ठोकली असती त्यांच्या विरुद्ध.
  • कधी कधी वाटतं, की एखादा राक्षस चुकून रागाच्या भरात ’हे मूर्ख’ वगैरे संस्कृतोद्भव शिव्या देण्याच्या ऐवजी ’u ediot' असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • दानवांची शस्त्रही जाणवण्याइतपत वेगळी असतात बरं का देवांपेक्षा! एखाद्या राक्षसाची तलवार बघा आणि देवाची बघा. उत्तर मिळेल. उत्तराच्या पाठीमागचं कारण मीच अजून शोधते आहे.
  • सगळे देव handsome आणि देव्या beautiful category त, तर दानव शक्य तितके विकृत, विचित्र दाखवले जातात. याला एकही अपवाद सापडणार नाही. बघा शोधून. म्हणजे देवत्व आणि दानव्य हा केवळ physical appearance वरच ठरतो की काय? एखाद्या चांगल्या चेहर्‍याच्या मागे दुष्ट/ क्रूर चेहरा लपलेला असू शकतो ही शक्यता कुठेच consider केली जात नाही. हा दोष कुणाचा?

बरं हे तर झाले मालिकारुपी चित्र उभं करतानाचे दोष. पण आणखी काही technical प्रश्न बरेच आहेत.

  • जेव्हा पृथ्वी समुद्रात बुडवली होती, तेव्हा विष्णूने अवतार घेउन तिला वाचवलं. आता जर पाणी फक्त पृथ्वीवरच अस्तित्त्वात आहे, तर हा आख्खाच्या आख्खा समुद्र आला कुठून? तो आहे कुठे? म्हणजे जर पृथ्वी बुडेल इतका जर समुद्र अस्तित्त्वात असेल तर तो आपल्याला सापडल्याशिवाय राहिला असता का?
  • जर देवाला भविष्यातलं कळतं, तर मग दानवांना वरदान देण्याच्या आधीच काळजी का नाही घेत? बरं एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण देवही अशा चुका सारख्याच करताना दिसतात. मग आपल्यसारख्या बापुड्या मनुष्यप्राण्याच्या हातातून चुका झाल्या तर त्यात नवल ते काय?
  • कृष्णाला खरंच अर्जुनाला भगवद्गीता समजावून सांगण्याइतका वेळ कुरुक्षेत्रावर मिळाला? तोवर बाकीचे लोक करत काय होते? मालिकेमधे दाखवताना सोयीसाठी म्हणून मागचे सगळे लोक ’pause’ status मधे दाखवतात. प्रत्यक्षात असं थोडंच असेल?
हे आणि असे बरेच प्रश्न मला सारखेच पडत असतात. आणि मला खात्री आहे की असे प्रश्न पडणारी मी एकटीच नक्कीच नाहीये. उत्तरं शोधायची सध्यातरी मला घाई अजिबात नाही. जोवर त्या उत्तरांवाचून काही अडत नाही तोवर चाललय ते चालू देत हेच माझं धोरण आहे. पण तुमच्याकडे उत्तरं असली तर जाणून घ्यायला नक्की आवडतील. आणि असे अजून प्रश्नही!

P. S. कृपया हा लेख वाचून माझ्या आस्तिकते/नास्तिकते बद्दल शंका काढू नका. जे मनात आहे ते मांडलंय इतकंच. अर्थात १००% आस्तीक माणूसही या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करु शकेल की नही याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे.

Wednesday, October 27, 2010

Sometimes life seems so messy, nothing falls according to plan, according to expectations. Past few days, I start in the morning enthusiastically, hoping to get outcomes with some prior expectations. But at the end of the day I find myself coming back to square one. All the efforts, whole time is likely to go waste. Then I hope that at least the next day will be mine and everything will be fine. But the other day is also not so different from previous one. And I find myself trapped in a big infinite loop; escape route of which is not known. What goes wrong?? Do I expect too much? Sometimes I feel like I am trying to fit a model where there is actually no pattern at all. Then why to coerce the model forcefully?  Why everything seems good only if there is beautiful nice pattern? Why can't I take randomness as an unavoidable part of life?

Sunday, October 24, 2010

yet another story

Have you ever searched for a thing which does not exist at all? Sounds weird,isn't it? How embarrassing the feeling could be when you put lot of efforts to find out something and after a looonngg time you come to know that the thing which you are searching for is not there?

Well, last week I went through the same situation, same feeling. Nowadays, whenever we want to have information about anything like place, things like accessories, electronic instruments,etc etc we just browse on internet and take that information for granted. We could never think even in our wildest dreams that the information could be wrong or old enough to get outdated.

Last week me and Meera were searching for an electronic accessories shop in Malleswaram. We got the information about that shop from internet. We tried calling on the contact number given bu it just gave the weird beeps and nothing else. We thought let's go simply and check it out directly. So we noted down the address and the contact number and headed towards Malleswaram. We searched  a lot.We wanted to go to temple road but half of the people were unaware about that address. One guy even asked us back which temple you are mensioning about? Is that some Ganpati temple, Sai baba temple, temple of some devimata or something else? It was a bigtime confusing question. We didn't know anything but just the temple road. After a half an hours extensive search on that afternoon, we finally got the temple road. And started looking for the survay number given in the address. Spending 5-10 minutes on the same road itself we got the correct builing but there was no banner of the shop we were looking for. confusion increased dramatically. Finally we asked the person in the footwear shop in the same building. Whatever he said, gave 440 volts shock to us. He said that the shop we were searching for is closed a year and a half back. We were standing in the place of same shop which is converted now to the footwear shop.

Our mouths were wide open when we heard this news. :)
We stepped out quietly and headed back.

It was really like searching for an address which now dosn't exist.

So people, if you are searching for an address or a place whose reference you have got from internet; make sure that address truly exists. Otherwise you will also end up facing the same situation like us.