Monday, July 26, 2010

नातं

तुला कुठे जास्त आवडत? मुदुमलाईला की बेंगलोरला?

मला हा प्रश्न विचारला गेला आणि मी विचारात पडले. प्रश्न जितका सोपा तितकं उत्तर अवघड आहे. प्रत्येक जागेची स्वतःची अशी खासीयत आहे. एखाद्या जागेशी आपण इतके attach  कसे होऊ शकतो? इतके पटकन धागे जुळले कसे जाऊ शकतात?

बेंगलोर मला आवडत कारण मला ते थोडंफार पुण्यासारखाच वाटतं. शहरात रहायची सवय असल्यामुळे बेंगलोरशी जुळवून घेताना फार त्रास झाला नाही. मुळात या शहराचा मी अत्यन्त थोडा भागच जास्त बघितलाय. जितके दिवस मी तिथे असते तितके IISc च्या campus मधेच जास्त असते. त्यामुळे बाहेरच्या धकाधकीच्या, प्रदूषित आणि गजबजलेल्या भागात जायची गरजच मुळात नाही वाटत.
तिथे इतकी ओळखीची माणसं आहेत, मराठी आणि मराठेतरही. शिवाय एक दोन हक्काची घर आहेत, विचारपूस करणारी, काळजी करणारी मंडळी आहेत की सगळ वातावरणच आपलसं होऊन जातं.

मुदुमलाईबद्दल काय बोलणार? हे तर माझं second home आहे. इथे office आणि घर यात फारसा फरकच नाहीये. खूप informal आहे इथली lifestyle. इथे असलं की दिवसाचं आणि तारखेचं भानच उरत नाही. सगळे दिवस सारखेच!!! weekends ल सगळे इथे असले की वेळ कसा निघून जातो त्याचा पत्ताही नाही लागत. अशाच वेळी weekends ला इतकं काम करून होतं की जे पूर्ण आठवड्यात नाही झालं. कामाचा उत्साह आला की लगेचच काम करता येतं आणि कंटाळा आला की break घेताही येतो. कधीकधी हुक्की आली की आम्ही सकाळी अगदी सहा वाजता उठून कामाला लागतो, कधी रात्री उशीरापर्यंत काम करतो आणि दुपारी एखादा सिनेमाही बघतो.
मी एकदम शहरात वाढलेली असल्यामुळे मला खेडेगावात रहायचं आकर्षण पहिल्यापासूनच फार. शाळेत असताना माझ्या सगळ्या मैत्रीणी सुट्टीत गावी जायच्या. तेव्हा मला त्यान्चा खूप हेवा वाटायचा. असं वाटायचं, आमचं अस गाव का नाही बरं? असं छान कौलारु घरात रहायच स्वप्न कधितरी पाहिलं होतं मी. ते असं कामाच्या निमित्ताने पूर्ण होइल अस कधीच वाटलं नव्हतं. अक्षरशः मी सध्या paid vacation वर आहे अस म्हणायलाही हरकत नसावी.
व्हरांड्यात बसून आम्ही असा मस्त निसर्गाचा आस्वाद घेत घेत रोज जेवतो, प्रत्येक पाच मिनिटाला आजूबाजूचं वातावरण बदलत असतं, कधी स्वच्छ नितळ सूर्यप्रकाश, कधी गच्च भरलेलं आभाळ, कधी इतकं धुकं की समोरचं घर सुद्धा दिसत नाही. पावसाची भिंत सरकत सरकत आपल्या दिशेनं येताना कधी बघितलीच नव्हती या आधी. कधी समोरचा निलगिरी मस्त ऊन खात बसलेला असतो, तर कधी ढगात हरवून गेलेला असतो. वार्‍याचा जोर कधी इतका असतो की मी उडून जाइन अस वाटतं. picnic spot म्हटल तर बरेच आहेत, म्हटलं तर नाहीतही. पण असं काही असायलच हवं का? असं कुठेतरी छान जागी बसून निवांतपणे वेळ घालवला तर ती काय ट्रीप होऊ नये?
मुळात मी हे सगळ आधी अनुभवल नसल्यामुळे मला या सगळ्याचं जास्त अप्रूप वाटतही असेल. इथे असलेल्या इतर सुविधांमुळे इथलं आमचं जीवन खूपच सुसह्य आहे हेही तितकंच सत्य आहे. इथे २४ तास वीज उपलब्ध असते. बराच वेळ वीज नाही असं गेल्या सम्पूर्ण वर्षात फक्त २-३ वेळाच घडलंय. पाणीही मुबलक प्रंमाणात उपलब्ध आहे. ईंटरनेट आहे. खाण्यापिण्याची चंगळ आहे. त्यामुळेही कदाचित मी इथे पटकन रुळले असेन.
पण त्याहीपेक्षा इथली माणसं ही जास्त कारणीभूत असावीत असं मला वाटतं. इथल्या Ph. D students/ researchers  मुळे मला आणि मीराला कधी एकटं नाही वाटलं. उलट त्यांच्या बरोबर गप्पा मारताना, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेता आलं. हळूहळू आम्हालाही त्यात रस वाटू लागलाय. आमच्याच विषयाकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन बदललाय. या सगळ्यांबरोबर राहण्याची खूप सवय झालीये आता.
यापेक्षा दुसर काय हवं? नाहीतर एकटेपणी स्वर्गात जरी ठेवलं तरी कोणाचं मन रमेल असं वाटत नाही मला. निदान माझं तरी नक्कीच नही रमणार.

जगात इतर अनेक यापेक्षा सुंदर, निसर्गाचा वरदहस्त असलेल्या जागा असतीलही. नव्हे, निश्चितच आहेत. पण माझं नातं या जागेशी, इथल्या माणसांशी जुळलय खरं, अगदी मनापासून.

5 comments:

  1. पहली बार आपके ब्लॉग पर आई...शानदार ब्लॉग.

    ReplyDelete
  2. "paid vacation" Thats all :D

    ReplyDelete
  3. waah! vachun khoop sahi vaatla! khoopach chaan lihilayes, ekdum manaapaasun...'jaageshi naata julta' hyacha anubhav malahi aalyamule, janavlyamule haa lekh agdi manaat utarla...dhanyavaad!

    ReplyDelete
  4. beyond words..hya lekhamule mipan tikde firun aalo.. mast..

    ReplyDelete